या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 17 October 2011

पत्रास कारण कि

                                                  //श्री//                             

१७/१०/२०११                                                                                          सौ गीतांजली शेलार 
सोमवार                                                                                                                सांजवेळ 


                                     आदरनीय,
                                                 माझ्या बाळाचे गुरुजन ,
                                                       स. न .वि .वि . पत्रास कारण कि ,
माझ्या हृदयातील ज्या लहरींच्या प्रेरणेने हृदयाची हालचाल चालू आहे त्या लहरींचा निर्माता, माझ्या संधीकाली असणाऱ्या आयुष्याचा आधार, माझ्या मनाचा आनंद असणारा माझा बाळ मी त्याच्या पुढील जडणघडणी करता तुमच्याकडे सोपवताना माझ्या मनातील माझ्या स्वप्नांची, माझ्या अपेक्षांची जी काही यादी म्हणा हव तर ती मी तुम्हाला सांगू इच्छिते, म्हणून तुमच्या अमूल्य अशा वेळेतील काही मिनिटे माझा हा पत्रप्रपंच वाचण्यासाठी द्यावा हि नम्र विनंती!
       माझ्या मनातील या ताऱ्याला, माझ्या आयुष्यातील स्वप्नांच्या या वेलीला आकाशाला गवसणी घालायची कला शिकवा !ज्यामुळे तो फक्त माझ्याच मनातील तारा न राहता समाज्यातील दीनदुबळ्या प्रत्येक घटकाच्या मनातील स्वप्नांचा वेलु बनेल ! त्याला बाराखडी शिकवताना क -कमळाचा ख -खगाचा आणि ग -गवताचा नक्की शिकवा,हे शिकवताना त्याला हा निसर्गच आपला निर्माता आहे याची अवहेलना करताना तुला तेवढच दु:ख होऊ दे जेव्हड तुला तुझ्या आई बाबाची अवहेलना होताना होईल हेही नक्की   शिकवा! फुलपाखरू जसं लहान मोठ्या प्रत्येक फुलातील मधुरस प्राशन करून आपल्या पंखांवर अनेक रंग घेऊन जशी आनंदाने बागडतात तसं प्रत्येक क्षणातील लहान मोठं सुख जगायचं कसं हे शिकवा म्हणजे त्याच आयुष्य फुलपाखराच्या पंखान्प्रमाणे विविधरंगी होईल ! 
        खळखळ वाहणारा निर्झर जसं त्याच्या शुद्ध पाण्याने काठावरील प्रत्येक सान थोराची तहान भागवण्यात धन्यता मानतो तसं यालाही प्रत्येक अबालवृद्धाची काठी होऊन सेवेच्या आणि प्रेमाच्या निर्मळ जलाने त्यांची तृषा शांत करताना निरपेक्ष भावना उरी कशी जपावी हे शिकवा ! नदी जसं डोंगराच्या कड्यावरून कोसळल्यानंतरहि तिचा प्रवाह अखंड चालू ठेवते आणि स्वताची वेदना उरी साठवून भोवताल हिरवाईच्या नवचैतन्याने नटवून पुढे चालत राहते तसं त्यालाही सांगा निराशेच्या गर्तेत गेल्यावरही स्वताच्या वेदनेच भांडवल न करता जवळच्या गरीबांच जीवन सुखाच्या हिरवळीने व्यापून टाक, स्वताचा प्रवास न थांबवता ! 
        पाखरू जसं दिवसभर चाऱ्यासाठी हिंडून सायंकाळी घरट्याकडे झेपावते तसं तुही संपूर्ण जगातील ज्ञान मिळवण्याच्या नादात स्व:तच्या  मूळ घरट्यात परतायचं असतं हे कधी विसरू नकोस! आणि तुझी ज्ञानार्जनाची भूक भागविण्यासाठी काही क्षणांसाठी दूर जाताना भांबावून जाऊ नये हेही शिकवा माझ्या पिलाला! डोंगर जसं वाऱ्यावादळात जराही विचलित न होता भक्कम राहतो तसं तुही या समाजाने निर्माण केलेल्या चक्रीवादळात हरवून न जाता बरोबरच्या आणखी चार जणांना घेऊन कसं तटस्थ रहायचं हेही नक्की शिकवा ! 
         त्याला हे सांगा कि फणसा नारळाप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनात असतो  एक हळवा गोडवा जो मिळवायचा असतो न थकता त्याचे काटे काढून व कडक करवंटी फोडून ! थकु नकोस हे करताना कारण कष्ट करून जी गोष्ट मिळवशील ती तुला फक्त सुख नाही देणार तर आत्मसुख देणार आहे ! कितीही छोटा जीव असलास तू, तरी तुझ्यासारख्यांना  एकत्र घेऊन कितीही मोठं कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असते आपल्यात! हे पटवून देताना मुंग्यांच्या एकीने कसं भलमोठ वारूळ तयार होत हेही दाखवा त्याला!
          त्याला शिकवा कितीही मोठा तरु बनलास समाजाच्या, दृष्टीने तरी वेलींनाअंगाखांद्यावर घेऊन त्यांनाही आकाशाजवळ नेऊन सोड त्या अशोकवृक्षाप्रमाणे !आणि त्याचवेळी तुझी मूळहि घट्ट कर जमिनीत त्या वटवृक्षाप्रमाणे!  त्याला शिकवा शोधायचं असत या निसर्गाच्या कुशीत लपलेल सत्य, जे आपल जीवन संमृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करेल ! त्याला हेही सांगा आपला निर्माता असणाऱ्या निसर्गाने बनविली आहे प्रत्येक गोष्ट माणसाच्या भल्यासाठी फक्त कसं ते आपण ओळखायच असत ! 
          माजलेल्या भल्यामोठ्या हत्तीला जसं छोटी मुंगी काबू करू शकते तसं तू कितीही लहान असलास तरी तुझी सत्याची आणि प्रेमाची ताकत अगडबंब अशा संकटालाही वेसन घालू शकते हे त्याला समजावून सांगा! 
तुम्हाला मी माझा संगमरवरी दगड सुपूर्द केला आहे त्याला तुम्ही पायरीचा आकार दिलात तर मी समजेन माझा बाळ ज्ञानेश्वर बनला म्हणून नक्की तुम्हाला दुवा देईन! त्यातून तुम्ही कळस घडवला तर मी समजेन तुम्ही तुकाराम घडवला आणि तुम्हाला दुवा देईन ! आणि तुम्ही त्याची मूर्ती घडवली तर मी समजेन तुम्ही राम ,कृष्ण किंवा शिवाजी राजे घडवलेत आणि तुम्हाला दुवा देईन ! 

                                                                                              -तुमची कृपाभिलाषी 
                                                                                                      सौ गीतांजली शेलार.

                                                                                          
                     

Wednesday 12 October 2011

माझी जगावेगळी प्रेमकहाणी !

     आज गजर होण्याच्या आधीच जाग आली. पहाटेचे साडे चार वाजले होते, उजाडायला अजून बराच वेळ होता म्हणून या कुशीवरून  त्या कुशीवर वळत होतो पण झोपेला काही माझ्या डोळ्यांचा पत्ता गवसत नव्हता! काळजी   मग ती येणाऱ्या सुखद क्षणाची असो अथवा लहान मोठ्या संकटाची, मनात तितक्याच ताकतीच काहूर निर्माण करायला पुरेशी असते. रात्री बापूंचा फोन आल्यापासून मनाची हर्षित अवस्था मित्रांपासून लपता लपत नव्हती, कशी लपेल मी कधीचा मनाशीच हसत होतो, जेवतानाही मन जेवणात नव्हतच! शेवटी न राहवून विलास म्हणालाच,''आम्हाला कळेल का या आनंदचे कारण?''
''अरे काही नाही उद्या बापू आणि दादा येणार आहेत दादाला मुलगी पाहायला आम्ही जाणार आहोत.''
'' तू असा काही वागतो आहेस कि मला वाटल तुलाच मुलगी पाहायची आहे!''
'' नाही रे, आमच्या चौघांच्या घरात हे नवीन माणूस म्हणजे थोडी उस्तुकता असणारच ना ? त्यात मला बहिण नाही, म्हणून रे बाकी काही नाही!''
       सगळ्यांच्या आधी उठून चहा, नाश्ता उरकून बसलो. बाल्कनीत येऊन बापू आणि दादाची वाट पाहत होतो. समोरच्या मोकळ्या मैदानात होस्टेलची मुलं क्रिकेट खेळत होती .
सुहास मला हाक मारत होता ''चल ना विकास''
''नको रे सुहास त्याची इस्री मोडेल कपड्यांची, आज वहिनी पाहायची आहे आम्हाला'' माझ्या आधी विलास उत्तरला. सगळे हसत निघून गेले . त्यांचा खेळ मी बाल्कनीतून बघत होतो..
''विकास ,ये विकास  आवरल का रे ''बापूंची हाक. मी वाकून बघितलं तर दोघेही आले होते मी धावत खाली गेलो दादाच्या मस्करीचा एकही चान्स मला सोडायचा नव्हता. गेल्या गेल्या दादाला मिठी मारली,''काय मग नवरदेव, चला लवकर वहिनी वाट पाहत असतील'' थोडसं हसून दादाने स्वताची सोडवणूक केली नि उत्तर न देता गाडीत जावून बसला. तो अबोल आहे पहिल्यापासून पण असं.....जाऊ दे न हा कदाचित लाजत असेल आणि आहे त्याचा स्वभाव नको त्या गोष्टीच ओझं मानगुटीवर घेऊन रडत बसण्याचा ... पण आज मात्र मी फुल मूडमध्ये होतो ... आज बापू नि आई कुणाच मी ऐकणार नव्हतो. माझी बडबड ऐकून बापू मनापासून दाद देत होते ...शेवटी त्यानीही हि वेळ आतुरतेने इच्छिली होतीच कि ...एक तास पूर्ण प्रवासात मी दादाची मस्करी करण्यात इतका दंग होतो कि त्याच्या काय भावना आहेत, काय स्वप्न आहेत हेही जाणून घ्यावं हे भान उरलं नाही. माणूस स्वानंदात इतका बुडून जातो कि समोरचं माणूस खरोखर आपल्या सुखात समाधानी आहे कि नाही याचा त्याला विचारही करावासा वाटत नाही मग तो तुमचा कुणीही असो...मी याला अपवाद कसा असेल!   
   आम्ही तिथे पोहचताच जंगी स्वागत झालं. हळूच दादाला कोपर मारला नि कुजबुजलो,''स्वागत जावईबापू!''
बैठकीची खोली नीटनेटकी सजवलेली, गर्भश्रीमंती प्रत्येक वस्तू पाहून लक्षात येत होती . चहापान झालं . मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झाला . मुलीचा भाऊ तिला घेऊन बैठकीत येत होता सर्वांच लक्ष्य तिकडे नि मी दादाला कोपरखळ्या मारण्यात गर्क! मुलगी समोर येऊन बसत होती तो मी तिला पाहिलं नि हातभर वर उडालो...जो चेहरा मी गेली दोन वर्ष मनाच्या कोंदणात ठेऊन पूजत होतो नि माझ्या वहीत फक्त तिच्याच सौंदर्याच्या वर्णनाने पानेच पाने भरली होती, जी माझ्या हृदयातील मंदिरात स्थानापन्न झालेली देवता होती, जिच्यासाठी मी सर्वकाही विसरून तासन तास तिच्या फक्त एका दर्शनासाठी कॉलेजच्या गेटमध्ये बसून असायचो ती माझी स्वप्नपरी,माझी प्रिया, माझी ह्रिदयचोर कोमल होती.... माझ्या मनाच्या या देवतेला या क्षुद्र जीवाबद्दल काहीच माहित नव्हत मी आपला एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेला एक प्रेमवीर होतो ज्याचं प्रेम त्याच्या मनाच्या नि वहीच्या बाहेर कधी आलच नव्हतं...पण आज असं काही समोर उभं राहील हे माझ्या कधी स्वप्नीही नव्हतं! रात्रीपासून हवेत उडणारा मी धाडकन जमिनीवर आदळलो होतो .... अशा ब्रह्मसंकटात सापडलो होतो कि ....अचानक आलेल्या वळीवाने बहरलेला गुलमोहर लुटून नेला .......................मी मात्र न वर्णिता येईल अशा संभ्रमात अडकलो होतो.............
    त्यानंतर काय झालं, मी कसा घरी आलो ,दादा काय बोलला हे आठवत नाही. मी एका अशा अवस्थेत होतो कि दुसऱ्या दिवशी जरासा भानावर आलो .तोपर्यंत हे काय झालं , दादाऐवजी दुसरा कुणी असता तर भांडून,विनंती करून कसही मी तिला मिळवलच असतं पण जर दादाने होकार दिला तर? का देईल तो नकार? इतकी सुंदर, सालस मुलगी तो नको म्हणणार नाही ,आणि ती जर वहिनी म्हणून घरात आली तर मी स्वतःला संभाळू शकेल का ? बर झालं मी कुणालाही माझी हि प्रेमकहाणी सांगितली नाही. कमीत कमी मी एकटाच सहन करणारा असणार आहे..... हो पण आता माझ्या आयुष्यातील लग्न हि गोष्ट मी काढून टाकणार! तिच्याशिवाय दुसरी कुणी ....नाही विचारही मनात आणू शकत नाही ! काय करू ...माझ्या मनाची हि अवस्था कुणाला सांगू ! आईला ...नको ,कि बापूंना ...,कि विलासला ...नको बाहेरच्या माणसाला नको ..काय करू ...अस वाटत होतं डोक्याचे सगळे केस उपटून काढावेत ,भिंतीवर डोक आपटाव कि ....
    दिवसभर कॉलेजला गेलो नाही ,न जेवता तसाच पांघरुन घेऊन झोपून राहिलो . मित्रांनी कमेंट केल्या पण त्या समजण्याच्या पलीकडे मी गेलो होतो,शेवटी तीही कंटाळून कॉलेजला गेली. चारच्या दरम्यान बापूंचा फोन आला, त्यांनी जे सांगितलं त्याने मला काय कराव काही कळत नव्हत. दादा नाही म्हणत होता लग्न करायला, बापू सांगत होते त्याला समजाव म्हणून! आता मी कस समजावणार होतो देव जाणे ! दादा इतक्या सुंदर मुलीला का नाही म्हणत असेल? मी काल येताना काही बरळलो तर नाही? तसं बापूनी सांगितलं असत मला, काय झालं दादाला, कुणी दुसरी? त्याने मला सांगितलं असतं, कदाचित लाजला असेल, पण आईला नक्की सांगितलं असतं ...मला आनंद होत होता पण वाईटहि  वाटत होत तिला नकार कळल्यावर ती आमचा सर्वांचा तिरस्कार तर करणार नाही? एक ना अनेक शंका माझं मन पोखरत होत्या.
     दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटमध्ये थांबायचं धाडस झालं नाही पण म्हणतात ना भित्यापाठी ब्रह्मराक्षस तसं ती माझ्या समोर आलीच! पण ती हवीशी वाटणारी एक रमणी होती , माझी? कोमल होती. पर्वाची ओळख लक्षात ठेऊन तिने एक हसरा कटाक्ष माझ्याकडे टाकला ,माझ्या शरीरात एक गोड ,हवीशी वाटणारी वेदना सरसरून अंगभर पसरली , क्षणभर कोमल मोरपीस चेहऱ्यावर फिरतोय असं भासलं ! भानावर आलो तर तिथ कुणीच नव्हत..मनाचं हे सुख क्षणभर राहील! वाटल तिला उद्या नकार कळला तर काय होईल ? देवाला माझी दया कधी येईल का ? तसाच परत होस्टेलला आलो . आपण कितीही अस्वथ असलो तरी जगापासून मनाची हि होरपळ लपवाविशीच वाटते, डोक्यावर पांघरून घेतलं कि कुणाला काही कळणार नाही असच वाटत  राहते ... पण लपवल्याने  प्रश्न अनुत्तरीत राहण्याची भीती जास्त ! जखमेची खपली न काढता कितीही औषध लावलं तरी जखम बरी थोडीच होणार आहे ,जखम बरी होण्यासाठी खपलीखालची ठसठसणारी घाण निघणे गरजेचे ! आईनेच हे कधीतरी सांगितलं होतं ! मी लगेच उठलो नि बापुना  फोन केला .
''बापू, मी बोलतोय, विकास''
''अरे हा बोल विकास, अरे हो तुला सांगायचं राहील ,अरे तुझ्या दादाने दुसरीच मुलगी पहिली आहे म्हणून तो लग्नाला नकार देत होता , सकाळीच आईला सर्व सांगितलं त्याने आणि फोटोहि दाखवला मुलीचा, सुरेख आहे मुलगी आणि शिकलेली सुद्धा , तीन वर्षापासून चाललय पण दादाने मागमूस लागू दिला नाही ,आईला आणि मला वाईट वाटल ...एव्हडे मैत्रीचे संबंध ठेऊन मुलांना आपण जवळचे वाटत नाही म्हणून ...पण जाऊ दे त्याचा आनंद तोच माझाही म्हणजे आपला सर्वांचा रे , तुला फोन करणार होतो पण म्हटल तू कॉलेजांत असशील ...बर तू का फोन केलास? ''
''.....''
''सांग न विकास , काय झालं ?''
'' काही नाही बापू , तुम्ही नकार कळवला ?''
''नाही , म्हटल प्रत्यक्ष जाऊन सर्व सांगाव नि झाल्या गोष्टीबद्दल माफी मागावी ''
''तुम्ही जायच्या आधी माझ्याकडे याल का ?''
''हो येईल बाळा, काही काळजीच नाही ना?''
''नाही बापू ,आल्यावर बोलेन मी ''
''ठेऊ मग ''
''हो ,आणि होस्टेलमध्ये या ''
''बर बर ''
फोन ठेवला पण डोक्यावरच भलमोठ ओझं कमी झाल्यासारख भासल ,पण आता पुढच्या मोठ्या परीक्षेची तयारी करायची होती ती म्हणजे बापूंना सर्वकाही खर सांगण्याची .....
       आजची सकाळ पावसात धुवून निघालेल्या झाडासारखी स्वच्छ, मोकळी वाटत होती . एक वेगळाच विश्वास मन भरून उरला होता ...मी आजची परीक्षा नक्की पास होणार ....कदाचित माझ्या अर्ध्या बोलण्याने बापू झोपू शकले नसावेत म्हणून लवकर उठून आठ वाजता होस्टेलच्या वेटिंगररूम मध्ये आल्याचे निरोप माळीकाकाने आणला. सर्व आवरून मी खाली गेलो ,बापू वाटच पाहत होते .
''चला बागेत बसू ''
''बोल विकास ,काय झालं आता रात्रभर मी आणि तुझी आई झोपलो नाही, काही आजारी नाहीस ना ? का कुणी त्रास देत तुला? परीक्षेच टेन्शन अजिबात घेऊ नकोस , एक ऐवजी दोन वर्ष लागू दे मी आहे ना , पण मुलांनी सुखी असाव एव्हडच वाटत रे , बोलं रे बोल आणखी उत्कंठा नको लावूस.''
'' नाही बापू माझी काही काळजी करू नका, आणि कॉलेजच म्हणाल तर मी नक्की चांगल्या मार्कांनी पास होणार आहे, पण आज मला काही मागायचं आहे ,आणि हो तुम्हीही तुम्हाला आवडल तर होकार द्या.''
''....बापू मला आपण पाहायला गेलेलो ना ती मुलगी आवडते ,दोन वर्षापासून मी तिच्यावर प्रेम करतो पण तिला काय कुणालाच सांगण्याच धाडस मला झालं नाही ,त्या दिवशी दादाची नवरी म्हणून तिला पाहिलं नि मी गळूनच गेलो , पण नन्तर कुणाला न सांगता मनात ठेवण्याचा निर्णय घेतला पण दादाचा नकार समजल्यावर  पुन्हा अस्वस्थ झालो नि विचार करून करून शेवटी तुम्हाला सांगण्याच ठरवल कारण तुम्हीच सांगता ना विचारल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत म्हणून ! बापू नकार सांगण्यापेक्षा तुमच्या लहान मुलासाठी मागणी नाही घालू शकत तुम्ही ! प्लीज बापू , हीच वेळ आहे तिला सांगण्याची कारण मी तिच्या समोर गेलो कि माझी वाचाच बंद होते ! तुम्ही माझे वडील तर आहात पण माझे मित्रही आहात ,तुम्हीच मला या संभ्रमातून बाहेर काढू शकता ! कराल ना बापू एव्हड ,प्लीज मला समजून घ्याल ना ?''
बापू उठले नि मला कडकडून मिठी मारली ,नि डोळ्याच पाणी पुसत म्हणाले ,'' मलाही ती मुलगी सून म्हणून आवडली होती रे, पण तुला कुठल्या तोंडाने विचारावे हेच कळत नव्हत , वाटल तु काही वेगळा विचार तर करणार नाहीस, पण त्या विधात्यालाच काळजी रे सगळ्याची! माझ्या मनातल बोललास बाळा ,मनातल बोललास! आत्ता जातो नि त्यांना सांगून येतो .''
मी गपकन वाकलो नि बापूंचे पाय धरले , त्यांनी परत मला उराशी कवटाळल . परत यायला उशीर झाल्याने , फोन करूनच बापुंनि त्यानीही हि गोष्ट आनंदाने स्वीकारल्याच सांगितल .....
     आज आवरून कॉलेजच्या गेटमध्ये बसलो, ती  येण्याच्या दोन तास आधी ! ती ...आली....एक हसरा  कटाक्ष ....मी घायाळ ..........ती लाजली नि क्लास पर्यंत जाईपर्यंत खाली घातलेली मान वर केली नाही !  विलास ,सुहास सर्वजण प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत होते ,पण मी मात्र ..............................................