रोजची सकाळ स्मितासाठी प्रसन्न असायची , तिला कधी नाराज आणि दु:खी कधी कुणी बघितलं नव्हत ! सतत हसतमुख आणि गप्पा मारायला तर विचारू नका , पाच मिनिटाच्या संभाषणात ती इतकी आपली वाटायची कि परत माणूस भेटल तर बोलल्याशिवाय पुढ जातच नसे ! काही लोक पाण्यात विरघळनाऱ्या साखरेसारखी तर काही पाण्यात विरघळनाऱ्या मिठासारखे असतात! मीठ खारटपणा ठेऊन जात तर साखर गोडपणा ! दोन्ही कायम लक्षात राहतात पण एक वाईट म्हणून तर एक चांगल म्हणून! तशी हि साखर होती ! तिच्या गोडपनाणे ती प्रत्येकाची गोड आठवण असायची !
ज्याच्या आयुष्यात कायम एक सुरक्षित चौकट असते त्याला जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत हे जग सुंदर भासतं आणि जगातली माणस प्रेमळ! तसच स्मिताच होतं,तिला तिच्या घरात प्रेम प्रत्येक नात्याकडून मिळाले.तशी तिला नाती पण सर्व मिळाली ,आत्या ,काका ,काकी ,मावशी ,मामा ,मामी ,भाऊ ,बहिण !आणि प्रत्येक नात्याने तिला भरभरून प्रेम आणि एक सुरक्षित आयुष्य दिले ! तिला बहिस्त जगाचे खरे रूप कळलेच नव्हते ! अशी हि एक आनंदी ,समाधानी मुलगी ! तिला बाहेर जाण्याची वेळ आली ते तिच्या उच्चशिक्षणासाठी! तिथेही तिच्या मनमोकळ्या स्वभावाने तिने सर्वांना आपलसं केलं नाही तर नवल !
साधारण महिन्यापूर्वी तिची एक प्रोजेक्टच्या निमित्ताने एका सिनियरशी ओळख झाली ,सौरभ तो ! सीनियर्स मध्ये तो सुंदर आणि सुस्वभावी मुलगा ,थोडा अलिप्त आणि अबोल ! काम आणि तो बाकी तो कुणाला जवळ करत नसे ! प्रत्येक कॉलेजमधली मुलगी त्याच्याशी मैत्री करायला उस्तुक पण तो काही कुणाला वाऱ्यालाही उभं करत नसे . इतर मुलींचं त्याच्या राजबिंड्या रुपाला पाहून जवळ येणं त्याला कधी भावलच नाही ! स्मिताने मात्र त्याच्या मुलींविषयीच्या कल्पनांना छेद दिला ! तो सिनियर होता पण ती कधी घाबरली नाही तिने शेवटी त्यालाच बोलत केल! त्यांची मैत्री चार पाच दिवसात एका सुंदर वस्त्राची घट्ट विन बनली ...आणि अशी बहरली कि .... मग फोनवर गप्पा कॉलेजबाहेर भेटणे ....तासन तास बरोबर घालवले तरी स्मिताला रात्री फोनवर बोलल्याशिवाय चैन पडत नसे !
''स्मिता , नक्की मैत्रीच आहे ना ?'' रूममेटचे प्रश्न !
'' तुम्ही दुसरा विचार करूच शकत नाही का ?''
''नाही ग ,रागावू नको पण तुझी ओढ पहिली कि वाटत ...''
''नको काही वाटून घेऊ , आम्ही फिरतोय म्हणजे मी त्याला आपल शहर दाखवत आहे . तो लांबचा आहे त्याच्या कंप्लीशन नन्तर तो आता जाणार आहे आणि परत नाही येणार ! आम्ही फक्त चांगल्या आठवणी गोळा करतोय ओ के ''
'' सॉरी पण जपून राहा .''
''बर येऊ ,त्याला रिझर्वेशन करायचं आहे उशीर होत आहे ,परवा जाणार आहे सौरभ ,बाय !''
धावत ती बाहेर आली तर सौरभ होताच . दोघांनी रिझर्वेशन करून पायीच रोडवर चालत राहिले ! दिवस मावळला पण त्यांचे पाय थकले नाहीत कि गप्पा संपल्या नाहीत ! रात्री हॉस्टेलवर जाताना ती अस्वस्थ होती पण तिला वाटायचं तो परत भेटणार नाही म्हणून कदाचित ... पण उद्याचा दिवस येउच नये आणि रात्र संपूच नये अस वाटतंय रे सौरभ हे तिने फोनवर त्याला सांगितलं .या विचारांमध्ये कधी झोप लागली ते तिला कळलेच नाही !
सकाळी जडावलेल्या डोळ्यांनी ती उठली .आवरून कॉलेजमध्ये गेली.सौरभ आज रात्री आठच्या बसने जाणार होता म्हणून दुपारचं जेवण ते एकत्र घेणार होते . जेवताना त्याने मराठी गाण्यांची एक सी डी त्याने तिला भेट दिली . सतत बडबडणारी स्मिता शांत होती आणि सौरभ अस्वस्थ दिसत होता .....त्यांची दुपार अशीच अबोल गेली पण या अनामिक ओढीचा उलगडा मात्र तिला झाला नाही ....
त्याचा प्रवास लांबचा म्हणून मध्ये काही खाऊ नकोस मी तुला डबा देते अस तिनेच बजावलं त्याला ! डबा घेऊन सात वाजता ती पोहचली सौरभ आलाच होता त्याचा मित्र होता बरोबर ,तिने डबा दिला आणि गाडी येण्याच्या दिशेने पाहू लागली .
'' आज बोलणार नाहीस , बडबडीच यंत्र बिघडल का ?''
''तू थांबू नाही शकत ?'' डोळ्याच पाणी पुसत तिने सवाल केला .
''तस काही कारण नाही ना ?''
''कारण शोधलं तर सापडेल कि !''
''नाही ग पण आई बोलावते आहे ''
''मीही थांब म्हणते ना !''
''सौरभ बस आली '' मित्राने आवाज दिला .मित्रानेच त्याच समान उचललं आणि गाडीत ठेवलं.
'' तू खरच थांब म्हणत असशील तर थांबतो '' सौरभ !
''नाही रे '' ती
''चला बसा लवकर '' बस ड्रायव्हर
सौरभने तिच्याकड पाहिलं तिचे पाणावलेले डोळे बघून तोही अस्वस्थ झाला ... तिने एक गुलाबाचं फुल दिल ...त्याने घेतलं ...
''थांबू का ?''
कस सांगणार होती थांब म्हणून तीच प्रेम आहे हे कळल तिला ...पण त्याच काय त्यालाही वाटत असेल असंच ...नसेल तर ? तस नसेल तर ...तो काय विचार करेल माझ्याबद्दल ! नको व्यक्त व्हायला ...नको ....
''बाय ...''तिच्या नकळत ती बोलून गेली ...बस गेली ...ती पाठमोऱ्या बस कडे न पाहताच झप झप पावले टाकत ती निघाली .... बेडवर पडून खूप खूप रडली ...रूममेट समजली काय ते !
ज्याच्या आयुष्यात कायम एक सुरक्षित चौकट असते त्याला जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत हे जग सुंदर भासतं आणि जगातली माणस प्रेमळ! तसच स्मिताच होतं,तिला तिच्या घरात प्रेम प्रत्येक नात्याकडून मिळाले.तशी तिला नाती पण सर्व मिळाली ,आत्या ,काका ,काकी ,मावशी ,मामा ,मामी ,भाऊ ,बहिण !आणि प्रत्येक नात्याने तिला भरभरून प्रेम आणि एक सुरक्षित आयुष्य दिले ! तिला बहिस्त जगाचे खरे रूप कळलेच नव्हते ! अशी हि एक आनंदी ,समाधानी मुलगी ! तिला बाहेर जाण्याची वेळ आली ते तिच्या उच्चशिक्षणासाठी! तिथेही तिच्या मनमोकळ्या स्वभावाने तिने सर्वांना आपलसं केलं नाही तर नवल !
साधारण महिन्यापूर्वी तिची एक प्रोजेक्टच्या निमित्ताने एका सिनियरशी ओळख झाली ,सौरभ तो ! सीनियर्स मध्ये तो सुंदर आणि सुस्वभावी मुलगा ,थोडा अलिप्त आणि अबोल ! काम आणि तो बाकी तो कुणाला जवळ करत नसे ! प्रत्येक कॉलेजमधली मुलगी त्याच्याशी मैत्री करायला उस्तुक पण तो काही कुणाला वाऱ्यालाही उभं करत नसे . इतर मुलींचं त्याच्या राजबिंड्या रुपाला पाहून जवळ येणं त्याला कधी भावलच नाही ! स्मिताने मात्र त्याच्या मुलींविषयीच्या कल्पनांना छेद दिला ! तो सिनियर होता पण ती कधी घाबरली नाही तिने शेवटी त्यालाच बोलत केल! त्यांची मैत्री चार पाच दिवसात एका सुंदर वस्त्राची घट्ट विन बनली ...आणि अशी बहरली कि .... मग फोनवर गप्पा कॉलेजबाहेर भेटणे ....तासन तास बरोबर घालवले तरी स्मिताला रात्री फोनवर बोलल्याशिवाय चैन पडत नसे !
''स्मिता , नक्की मैत्रीच आहे ना ?'' रूममेटचे प्रश्न !
'' तुम्ही दुसरा विचार करूच शकत नाही का ?''
''नाही ग ,रागावू नको पण तुझी ओढ पहिली कि वाटत ...''
''नको काही वाटून घेऊ , आम्ही फिरतोय म्हणजे मी त्याला आपल शहर दाखवत आहे . तो लांबचा आहे त्याच्या कंप्लीशन नन्तर तो आता जाणार आहे आणि परत नाही येणार ! आम्ही फक्त चांगल्या आठवणी गोळा करतोय ओ के ''
'' सॉरी पण जपून राहा .''
''बर येऊ ,त्याला रिझर्वेशन करायचं आहे उशीर होत आहे ,परवा जाणार आहे सौरभ ,बाय !''
धावत ती बाहेर आली तर सौरभ होताच . दोघांनी रिझर्वेशन करून पायीच रोडवर चालत राहिले ! दिवस मावळला पण त्यांचे पाय थकले नाहीत कि गप्पा संपल्या नाहीत ! रात्री हॉस्टेलवर जाताना ती अस्वस्थ होती पण तिला वाटायचं तो परत भेटणार नाही म्हणून कदाचित ... पण उद्याचा दिवस येउच नये आणि रात्र संपूच नये अस वाटतंय रे सौरभ हे तिने फोनवर त्याला सांगितलं .या विचारांमध्ये कधी झोप लागली ते तिला कळलेच नाही !
सकाळी जडावलेल्या डोळ्यांनी ती उठली .आवरून कॉलेजमध्ये गेली.सौरभ आज रात्री आठच्या बसने जाणार होता म्हणून दुपारचं जेवण ते एकत्र घेणार होते . जेवताना त्याने मराठी गाण्यांची एक सी डी त्याने तिला भेट दिली . सतत बडबडणारी स्मिता शांत होती आणि सौरभ अस्वस्थ दिसत होता .....त्यांची दुपार अशीच अबोल गेली पण या अनामिक ओढीचा उलगडा मात्र तिला झाला नाही ....
त्याचा प्रवास लांबचा म्हणून मध्ये काही खाऊ नकोस मी तुला डबा देते अस तिनेच बजावलं त्याला ! डबा घेऊन सात वाजता ती पोहचली सौरभ आलाच होता त्याचा मित्र होता बरोबर ,तिने डबा दिला आणि गाडी येण्याच्या दिशेने पाहू लागली .
'' आज बोलणार नाहीस , बडबडीच यंत्र बिघडल का ?''
''तू थांबू नाही शकत ?'' डोळ्याच पाणी पुसत तिने सवाल केला .
''तस काही कारण नाही ना ?''
''कारण शोधलं तर सापडेल कि !''
''नाही ग पण आई बोलावते आहे ''
''मीही थांब म्हणते ना !''
''सौरभ बस आली '' मित्राने आवाज दिला .मित्रानेच त्याच समान उचललं आणि गाडीत ठेवलं.
'' तू खरच थांब म्हणत असशील तर थांबतो '' सौरभ !
''नाही रे '' ती
''चला बसा लवकर '' बस ड्रायव्हर
सौरभने तिच्याकड पाहिलं तिचे पाणावलेले डोळे बघून तोही अस्वस्थ झाला ... तिने एक गुलाबाचं फुल दिल ...त्याने घेतलं ...
''थांबू का ?''
कस सांगणार होती थांब म्हणून तीच प्रेम आहे हे कळल तिला ...पण त्याच काय त्यालाही वाटत असेल असंच ...नसेल तर ? तस नसेल तर ...तो काय विचार करेल माझ्याबद्दल ! नको व्यक्त व्हायला ...नको ....
''बाय ...''तिच्या नकळत ती बोलून गेली ...बस गेली ...ती पाठमोऱ्या बस कडे न पाहताच झप झप पावले टाकत ती निघाली .... बेडवर पडून खूप खूप रडली ...रूममेट समजली काय ते !