या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 2 November 2011

भारतीयाला अभिमान वाटावा अस काही

बऱ्याच दिवसानंतर एक चांगलं पुस्तक हाती लागल आहे 'किमयागार ' ! अच्युत गोडबोलेंनी पहिल्या लेखात प्राचीन भारताचे विज्ञानाला असलेले  योगदानाचे वर्णन केले आहे . त्यातील काही गोष्टी माहित आहेत पण त्याचा  पूर्ण इतिहास वाचताना आश्चर्य तर वाटतेच पण उस्तुकता ताणली जाते . आपल्या पूर्वजांचे हे विस्तृत ज्ञान तेही इतर जगाच्या आधी! अभिमान वाटतो .
    इ.स .पूर्व १५०० या सुमारास लिहिली गेलेली 'शल्वसुत्रे' या शल्वसुत्रांमध्ये पायथागोरसचा सिद्धांत लिहिलाय , पाय ची किंमत सांगितली आहे पण कारण दिलेलं नाही . महर्षी कणाद यांनी ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अणुविषयी तर्क केले होते . शून्याची कल्पना भारताने जगाला दिली आहे ! पाचव्या शतकातील आर्यभट्ट यांनी पृथ्वी गोल आहे ,स्वताच्या अक्षाभोवती फिरते आणि सूर्याभोवतीहि फिरते हेही जगाच्या आधी सांगितलं विशेष म्हणजे पृथ्वीचा परीघ त्यांनी गणिताने काढला (३९७३६किमी) आज तो ३९८४३किमी इतका आहे ,याच्याही पुढे जाऊन एका वर्षात ३६५ दिवस ,६ तास ,१२ मिनिटे आणि ३० सेकंद असतात हेही काढाल होतं!
      याशिवाय १२ व्या शतकातील भास्कराचार्य यांचेही गणितात खूप मोठे योगदान आहे ! वैद्यकीय शाखेत आयुर्वेद तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेते ! वेदकाळातील विद्यापीठे ,तक्षशिला,नालंदा आणि वाराणसी !
        लेखकांनी याविषयी आनंद व्यक्त केला आहे पण यानंतर आतापर्यंत खुंटलेल्या प्रगतीबद्दल खेदही व्यक्त केला आहे ! 

1 comment:

Anonymous said...

Very ordinary stories... some stories are even incomplete...