बेईमान मन , गेले मला सोडून
नव्या हृदयाशी , नवे नाते जोडून
बेईमान मन ....
मी अन माझे मन , सुखाची गुंफण
एकमेकांत विरघळलेलो , नव्हते कुंपण
बेईमान मन ....
सुगंधित एका क्षणी ,ते गेले बावरून
मी समजावले , काही काळ धरले सावरून
बेईमान मन ....
कसे ग मोहरले , प्रियास त्या पाहून
तन माझे थरारले , गेले पाखरू उडून
बेईमान मन ...
तमा नाही माझी त्याला , पुरे गेले बदलून
येईल काहो खरे सांगा , माझ्यासाठी ते परतून
बेईमान मन ....
-गीतांजली शेलार