तुझ्या सोईने ..
त्याचा प्रत्येक धागा वेगळे सांगेन काही ..
विरत चाललेलं प्रेम ,आशा ,आकांक्षा ..
घट्ट होणारा आक्रोश क्रोध ...कधी तिरस्कारही सापडेल सोबतीला ..
तेव्हा होऊ नकोस नाराज ....
जरी सापडला अगतिकता आणि असहायतेचा चुरगळलेला दोर तर ओढू नकोस ..
ताणलं तर तुटतं हेही ठेव लक्षात ..
तुच म्हणतोस आपण देतो तेच येतं बुमरँग होऊन ..
आताशा शेवटाला आलेला मायेचा आणि स्त्रीसुलभ ओलाव्याचा धागाही दिसेल !
डॉ संध्या राम शेलार .