चार दिवसापूर्वी माझ्या सासरच्या नात्यातील एका आजींच अचानक अल्पश्या आजाराने निधन झालं. तसं पाहिलं तर जन्ममरण हे कुणासाठी थांबलेल किंवा चुकलेल नाही पण काही व्यक्ती अस आयुष्य जगलेल्या असतात कि हि त्यांच्या जाण्याची घटना तिऱ्हाईत मानसाला अस्वस्थ करून जाते. या आजींच्या बाबतीत असाच काहीस घडल. परिसरातील त्यांना ओळखणारी जवळजवळ सर्वचजन तळमळली, त्यात मीही आलेच. त्या खूप जवळच्या नव्हत्या पण त्यांनी आमच् नातं जवळच बनवलं होतं. जितक्यावेळा त्या भेटल्या तेव्हा त्या आपलेपणाने जिव्हाळ्याने बोलल्या! गुलाबाच्या फुलासारखं काट्याच्या वेदना स्वत:जवळ ठेऊन भोवताल सुगंधित करणाऱ्यांपैकी त्या एक ! आयुष्यभर फक्त दु:ख सोसनाऱ्या, कुटुंबाची सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या, स्वताची दु:ख कधीच त्यांनी दया किंवा मदत मिळवण्यासाठी वापरली नाहीत.
लग्न झाल्यानंतर एक मुलगा आणि मुली पदरात टाकून जोडीदार अर्ध्यावर टाकून देवाला प्रिय झाले. नंतर छोट्या दीर जावांना सांभाळत आणि स्वताची मुले सांभाळत संसार पुढे नेला. मुलाच लग्न केलं तेही लहान तीन मुलं आणि शांत संय्यमी सून ठेऊन देवाला प्रिय झाले. पुत्रवियोग सहन करत नातवंड मोठी केली व्यवहार कुशलतेने , कष्टाने शेती करून इतर दीरानच्या बरोबरीला संसार नेऊन ठेवला. हे करत असताना सर्व नातेवाईकांच्या सुख दु:खात त्या सहभागी झाल्या. जळणाऱ्या ज्योतीसारख वेदना सहन करत प्रकाश मात्र सर्वाना दिला . दारातल्या तुळशी सारखं आयुष्य जगत तुळशीच्या ओट्यावर मृत्यूला त्यांनी जवळ केलं !
मी कविता करत नाही पण त्यांच्यासाठी सुचलेल्या या ओळी खाली देत आहे.
एक आत्मा आयुष्यभर फक्त दु:ख झेललेला
कधीचा एक अश्रू तिने पापण्यांवर पेललेला
अश्रुना मुभा नव्हती गालावर ओघळून मुक्त होण्याची
त्या आत्म्याला ताकत हवी होती फाटलेलं आभाळ पेलण्याची
उन पडलं वादळ आलं पाऊस आला
पिलांना पंखाखाली घेणारी पक्षीण ती
आयुष्यातील दु:खांसमोर
दत्त म्हणून उभी ठाकनारी वाघीण ती
रडण्याला आणि दु:खाला
तिनं कधीच बळ बनू दिल नाही
हसण्याणचं मानसं जिंकायची
जिंकायच्या दिश्याही दाही
अश्या या छत्रछायेला आपण
जरी आज पारखे झालो
नजर तिची घारीची तशीच आहे
आपण मात्र नतमस्तक होऊन वाकलो.
लग्न झाल्यानंतर एक मुलगा आणि मुली पदरात टाकून जोडीदार अर्ध्यावर टाकून देवाला प्रिय झाले. नंतर छोट्या दीर जावांना सांभाळत आणि स्वताची मुले सांभाळत संसार पुढे नेला. मुलाच लग्न केलं तेही लहान तीन मुलं आणि शांत संय्यमी सून ठेऊन देवाला प्रिय झाले. पुत्रवियोग सहन करत नातवंड मोठी केली व्यवहार कुशलतेने , कष्टाने शेती करून इतर दीरानच्या बरोबरीला संसार नेऊन ठेवला. हे करत असताना सर्व नातेवाईकांच्या सुख दु:खात त्या सहभागी झाल्या. जळणाऱ्या ज्योतीसारख वेदना सहन करत प्रकाश मात्र सर्वाना दिला . दारातल्या तुळशी सारखं आयुष्य जगत तुळशीच्या ओट्यावर मृत्यूला त्यांनी जवळ केलं !
मी कविता करत नाही पण त्यांच्यासाठी सुचलेल्या या ओळी खाली देत आहे.
एक आत्मा आयुष्यभर फक्त दु:ख झेललेला
कधीचा एक अश्रू तिने पापण्यांवर पेललेला
अश्रुना मुभा नव्हती गालावर ओघळून मुक्त होण्याची
त्या आत्म्याला ताकत हवी होती फाटलेलं आभाळ पेलण्याची
उन पडलं वादळ आलं पाऊस आला
पिलांना पंखाखाली घेणारी पक्षीण ती
आयुष्यातील दु:खांसमोर
दत्त म्हणून उभी ठाकनारी वाघीण ती
रडण्याला आणि दु:खाला
तिनं कधीच बळ बनू दिल नाही
हसण्याणचं मानसं जिंकायची
जिंकायच्या दिश्याही दाही
अश्या या छत्रछायेला आपण
जरी आज पारखे झालो
नजर तिची घारीची तशीच आहे
आपण मात्र नतमस्तक होऊन वाकलो.
No comments:
Post a Comment